🕒 1 min read
औरंगाबाद: राज्यात ठाकरे सरकार अतिशय चांगल्या रीतीने काम करत असून ठाकरे सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी भरघोस निधी शहरासाठी मिळाला असून येणाऱ्या काळात विविध विकास कामांसाठी जवळपास २६०० कोटींचा निधी या सरकारच्या काळात मिळाला आहे. शहरात बहुतांश ठिकाणी सिमेंटचे रस्ते झाले आहेत. शहरात तील मुख्य रस्ते त्याचप्रमाणे वाॅर्डातील अंतर्गत रस्ते एलईडीच्या झगमगाटामुळे उजळून निघाले आहे. निश्चितच शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी केले.
संत एकनाथ रंग मंदिराचे नूतनीकरण करून ते प्रेक्षकांच्या सेवेमध्ये सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सोयीसाठी विविध विकास कामे शहरात सुरू असून त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना शाखेच्या वतीने शिवसंवाद मोहीम सुरू आहे.
याप्रसंगी दानवे बोलत होते. शिवसंवाद मोहीमेनिमित्त मध्य शहरात ठिकठिकाणी बैठका संपन्न झाल्या. या बैठकीत आमदार दानवे यांनी पदाधिकारी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व त्यावर सूचनात्मक मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- “आता रं…लोचा झाला की”, वाईनविक्री निर्णयावरील विरोधकांच्या टीकेला रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर
- “मुख्य सचिवानेच पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली, मुख्यमंत्री उत्तर देणार काय?” बावनकुळेंचा सवाल
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; कोविड न्यूमोनियाचे झाले होते निदान
- “२०१४ साली ज्यांनी युती तोडली त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार का?”
- “नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले…”, अमृता फडणवीसांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
