Share

‘देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालंय’; न्यायालयाच्या दिलास्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाड, नाशिकसह पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून राणे यांना काल पोलिसांनी अटक देखील केली होती. तर, मंगळवारी सकाळपासूनच शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

राणेंना मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. आता उच्च नायालयाने देखील नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला आहे.

सुनावणी दरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे. तसेच राणेंवर जिथे गुन्हे दाखल आहेत तिथे हजेरी लावण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करतानाच देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालंय, असं म्हटलं. पुढे ते म्हणाले, मी असं काय बोललो होतो, ज्यामुळे तुम्हाला राग आला? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना विचारला आहे. तसेच हे बोलत असताना ‘ते’ वाक्य मी पुन्हा बोलणार नाही’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!