मुंबई : एकाच वेळी भारताचे दोन क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार आहे. प्रमुख खेळाडूचा संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तर इतर राखीव आणि युवा खेळाडूचा संघ हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर भारताचा माजी क्रिकेटपटु इरफान पठानने राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. ‘राहुल द्रविड ज्याप्रकारे मार्गदर्शन करतो त्यामुळे त्या खेळाडुंना पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. आणि जेव्हा एखादा खेळाडू अपयशी होतो तेव्हा द्रविड ज्याप्रकारे त्या खेळाडूला मार्गदर्शन करतो त्याने त्या खेळाडुचा आत्मविश्वास वाढतो.’असे इरफाण पठाण म्हणाला.
यावेळी त्याने २००७ विश्वचषक स्पर्धेतील एक किस्सा देखील शेअर केला होता. ‘२००७च्या विश्वचषकात जेव्हा भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यावेळी कर्णधार राहुल द्रविड होता. पराभवानंतर त्याने संघातील खेळाडूंना बोलताना तो म्हणाला की,’हा पराभव शेवट नाहीये, आयुष्य या पराभवापेक्षा नक्कीच मोठं आहे.’ असे म्हणाला होता.
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंका दौरा हा द्रविड आणि बीसीसीआयसाठी सारखाच महत्वाचा- लक्ष्मण
- कोरड्या हवामानामुळे मिरची पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव
- १० रुपयांच्या प्रवेश फी वरून कृउबा संचालकांच्या मुलाची कामगाराला मारहाण
- सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाल्या ६ दुचाकी
- कोरोना नियमाचे पालन करत वडोदचा आठवडी बाजार भरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

