Share

कोरड्या हवामानामुळे मिरची पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : देउळगाव बाजार येथे कोरड्या हवामानामुळे मिरची पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव सिून येत असून यामुळे शेतक-यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पंचायत समितीचे कृषि अधिकारी संतोष भालेराव यांनी येथील शेतकरी पुंजाराम विठ्ठलराव गरूड यांच्या शेतातील मिरचीसह परिसरातील मिरची पिकाची पाहणी केली असता मिरची पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून आल्याने यावेळी उपस्थित शेतक-यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

फुलकिडे हे पानाच्या खालच्या व वरच्या बाजूस राहतात व पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला वळतात यालाच आपण बोकड्या किंवा चुरडामुरडा म्हणतो. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एस.एल.५ मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के एस.सी.१५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करताना ०.१ टक्के चिकट द्रव्याचा वापर जरूर करावा.

भूरी या रोगामुळे पानाच्या पृष्ठभागावर आणि खालच्या बाजूस पांढरी बुरशी दिसते. रोग जास्त बळावल्यास पाने गळून पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्राम किंवा कॅप्टन व हेक्झाकोनॅझोल १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून २-३ फवारण्या दर पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात, असे यावेळी शेतक-यांना सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!