अहमदाबाद : इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोन खेळांडुना संधी दिली. आपल्या पहिल्याच सामन्यात इशान किशनने अर्धशतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली.
रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने अनुभवी सलामीवीर शिखर धवनला बाहेर बसवत इशान किशनला सलामीसाठी संघात निवडले. मात्र पहिल्याच षटकांत भारताने राहुलचा बळी गमावला. तेव्हा जबाबदारी इशान किशनवर येऊन पडली. इशान किशनने दबावाला झुगारत आपल्या पदार्पनाच्या सामन्यातच २८ चेंडुमध्ये दमदार अर्धशतकी खेळी साकारली.
मैदानात चौफेर चौकार आणि षटकारांची आतीषबाजी करत त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. आपल्या पहिल्याच सामन्यात षटकार मारत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केलं. इशानने एकूण ३२ चेंडूंमध्ये ५६ धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच दाद मिळवली. या खेळीत त्याने ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. या खेळीने त्याने क्रीडारसिकांची मनं जिंकून संघातील आपली निवड सार्थ ठरवत निवड समितीलाही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- धोक्याची घंटा; मराठवाड्यात २ हजार ४६७, विदर्भात ४ हजार ९९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- भारताने केली पराभवाची परतफेड; इंग्लंडवर ७ गडी राखुन विजय
- पथदिव्याचे १० कोटी रुपये थकल्याने नांदेड शहर अंधारात
- वाळूज कामगार वसाहतीच्या कोव्हीड सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

