अहमदाबाद: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.
नाणेफेक जिंकुन कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडुवर बटलर ला बाद करत भुवनेश्वरने चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर मलन-रॉय यांनी अर्धशतकी भागिदारी करुन इंग्लंडचा डाव सावरला. जेसन रॉयने इंग्लंडकडुन सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. निर्धारीत २० षटकांत इंग्लंडने ६ गडी गमावुन भारतासमोर १६५ धावांच लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात लोकेश राहुलचा बळी गमावला. मात्र यानंतर भारताकडून पदार्पन करणारा इशान किशनने धडाकेबाज खेळी करत पदार्पनातच अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या गोलदांजीची हवा काढून घेतली. इशान किशनने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. किशन बाद झाल्यानंतर कर्णधार कोहलीने नाबाद अर्धशतक (७३) झळकावत भारताला विजयी केले. सामनावीराचा मानकरी इशान किशन हा ठरला.
महत्वाच्या बातम्या
- पथदिव्याचे १० कोटी रुपये थकल्याने नांदेड शहर अंधारात
- वाळूज कामगार वसाहतीच्या कोव्हीड सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
- औरंगाबाद मनपा करणार पाच हजार कोव्हीड बेडची व्यवस्था
- औरंगाबादकरांनो सावधान ! लॉकडाऊन मध्येही कोरोनाचा कहर
- टॉलीवूड कलाकारांची भाजपमध्ये चलती, विधानसभा निवडणुकीत दिली उमेदवारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

