Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसोबत युद्ध लढणार आहेत का?; ‘या’ मंत्र्याचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

दरम्यान, दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असून त्या भागाला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे, असे नमूद करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसोबत युद्ध लढणार आहेत का?, असा बोचरा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

तुम्ही शेतकऱ्यांसाठी बंदोबस्त लावलाय की पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर बंदोबस्त लावलाय, अशी विचारणा करतानाच जनरल डायर नीतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपणे योग्य नाही, अशा शब्दांत मलिक यांनी टोला लगावला आहे. ही सगळी परिस्थिती निर्माण करून दडपशाहीच्या मार्गाने शेतकरी आंदोलन संपवण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. लोक हे कदापि स्वीकारणार नाहीत. ही डायर नीती केंद्राने तत्काळ थांबवावी, असेही मलिक यांनी केंद्र सरकारला ठणकावले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!