🕒 1 min read
मुंबई : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून आयर्लंडविरुद्धच्या (IRE vs IND) मालिकेची विजयी सुरुवात केली. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने आयर्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. या मालिकेत फक्त दोन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. दुसरा टी-२० सामना २८ जून रोजी होणार आहे. या सामन्यात उमरान मलिकनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून केवळ हा सामना जिंकला नाही तर एक नवा विक्रमही प्रस्थापित केला जो यापूर्वी कोणताही भारतीय कर्णधार टी-२० मध्ये करू शकला नाही.
या सामन्यात पंड्याने २ षटकात २६ धावा देत एक विकेट घेतली. पंड्या महागडा ठरला पण या विकेटसह तो टी-२० मध्ये विकेट घेणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही.
सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, ”विजयाने मालिकेची सुरुवात करणे खूप छान आहे, नशीब चांगले होते की आज सामना होऊ शकला. आमच्या संघासाठी विजयाने सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. उमरानशी बोललो. त्याला जुन्या चेंडूने गोलंदाजी करणे सोयीचे वाटते.”
????IPL 2022 trophy
????First Indian captain to take a T20I wicket
????First win as an Indian captainHardik Pandya's dream run as captain continues. pic.twitter.com/G7Zc77bfVa
— CricTracker (@Cricketracker) June 26, 2022
या सामन्यात भारतासाठी अनेक गोष्टी चांगल्या झाल्या. सलामीवीर दीपक हुडाने शानदार फलंदाजी करत २९ चेंडूत ४७ धावा करत संघाला लक्ष्यापर्यंत नेले. इशान किशननेही २६ धावांची छोटी पण प्रभावी खेळी खेळली. भारताकडून दिनेश कार्तिकने नाबाद ५ धावा केल्या. २८ जून रोजी दुसरा टी-२० सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
