Share

IPL 2022 : भारताच्या माजी खेळाडूचा विराटवर निशाणा; म्हणाला, “त्यानं ब्रेक घेऊन कॉमेंट्री करावी”

Published On: 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वसीम जाफरने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतरही त्याच्या फलंदाजीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. आयपीएलच्या १५व्या मोसमात विराट कोहलीला एकही मोठी इनिंग खेळता आलेली नाही. गेल्या सामन्यात तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १२ धावा करून धावबाद झाला होता. या कामगिरीनंतर वसीम जाफरने विराटवर मोठे वक्तव्य केले आहे.

विराटच्या (Virat kohli) फॉर्मवर प्रतिक्रिया देत वसीम जाफर (Wasim jaffer) म्हणाला, “विराट कोहलीने काही काळ ब्रेक घ्यावा आणि कॉमेंट्री करावी. यानंतर विराट धावांचा पाऊस पाडेल.” जाफरने हे केवळ विनोद म्हणून सांगितले आहे. वसीमने दिनेश कार्तिकचे उदाहरण देत कोहलीला हा सल्ला दिला आहे. कारण जेव्हा दिनेश कार्तिक खराब फॉर्मशी झुंजत होता. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर त्यानेकॉमेंट्री केली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये परतला आणि तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे.

विराट कोहलीला या मोसमात २३. ८० च्या सरासरीने केवळ ११९ धावा करता आल्या आहेत. त्याने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या बॅटने आतापर्यंत एकही अर्धशतकी खेळी दिसलेली नाही. विराट या हंगामात तो दोनदा धावबाद झाला आहे. यावरून त्याचे चाहते खूप निराश झालेले दिसत आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!