🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ४ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. पराभवाबरोबरच मुंबई संघाला दंडही ठोठावण्यात आला. निर्धारित वेळेत षटक पूर्ण न केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर दंडाचा निर्णय सुनावण्यात आला. या मोसमातील किमान षटकांच्या नियमाचे हे पहिले उल्लंघन आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई संघाला निर्धारित वेळेत षटक पूर्ण करता आले नाहीत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ५ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने शानदार फलंदाजी करताना नाबाद ८१ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने पराभूत संघावर माघार घेत ४ गडी राखून विजय मिळवला. दिल्ली संघाने ६ बाद १७९ धावा करत सामना जिंकला. ललित यादवने ३८ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. तुफानी खेळ करताना अक्षर पटेलने १७ चेंडूत नाबाद ३८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी मिळून ७५ धावांची भागीदारी केली. दिल्लीकडून ३ विकेट घेतल्याबद्दल कुलदीप यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : राशिद खानला मिळाली मोठी जबाबदारी..! पहिल्या सामन्यापूर्वी बनला गुजरात संघाचा…
- यशवंत जाधवांच्या डायरी संदर्भात अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “बरेच जण आपल्या आईला…”
- सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न; राष्ट्रवादीच्या ट्वीट करत शुभेच्छा
- गोव्याच्या १४ व्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ!
- IPL 2022 : आज नव्या संघांमध्ये पहिली लढत; वाचा काय सांगते वानखेडेची खेळपट्टी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
