Share

IPL 2022 : काय सांगता..! प्रेक्षकांच्या स्टेडियममधील प्रवेशाबाबत BCCI घेणार ‘असा’ निर्णय!

Published On: 

मुंबई : यंदाची आयपीएल स्पर्धा २६ मार्चपासून सुरू झाली आहे. गेल्या हंगामाप्रमाणे या लीगला करोनाचा फटका बसलेला नाही, त्यामुळे यावेळी बीसीसीआय केवळ दोन शहरांच्या चार स्टेडियममध्ये ही स्पर्धा आयोजित करत आहे. यापैकी तीन ठिकाणे मुंबईत आणि एक पुण्यात आहे. यावेळी, आयपीएलच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लवकरच स्टेडियममधील प्रेक्षकांची संख्या आणखी वाढू शकते. कारण देशातील करोनाबाबतची परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे. एका दिवसापूर्वी देशात कोरोनाचे १२५९ नवीन रुग्ण आढळले होते. तर ३५ जणांचा मृत्यू झाला. जे प्रमाण कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय लवकरच आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये ७० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देऊ शकते. लवकरच भारतीय क्रिकेट बोर्डाकडून या संदर्भात औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे सर्व सामन्यांच्या तिकिटांचे बुकिंगही सुरू झालेले नाही.

असे झाले तर चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल. कारण गेल्या दोन सत्रांपासून चाहत्यांना स्टेडियममध्ये बसून आयपीएलचा आनंद लुटता आलेला नाही. २०२०मध्ये, संपूर्ण आयपीएल यूएईमध्ये झाली. तर गेल्या वर्षी पहिला टप्पा भारतात झाला होता.

महत्त्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!