औरंगाबाद : केंद्र सरकार आपल्या ताब्यातील संस्थांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा कट रचत आहे. केंद्राचा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप सुरू आहे. १२ आमदारांच्या नियुक्त्या का रखडल्या, याचे उत्तर केंद्राने द्यावे. एनसीबीचाही वापर केंद्र सरकार करत आहे. किरकोळ कारणांवरून बॉलीवूडला का बदनाम केले जात आहे? असे विविध सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अशाप्रकारे केंद्र सरकारवर निशाना साधला.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर बोलण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, अशी टीका देखील केली. ते म्हणाले, ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने अध्यादेश काढला. मात्र, वाघ नामक व्यक्तीने या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान दिले. हा माणूस भाजपचा जळगाव जिल्हा सरचिटणीस असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा आहे. त्यामुळे भाजप ओबीसी आरक्षण विरोधात आहे.
शनिवारी सायंकाळी भुजबळ यांनी समता परिषदेचे अध्यक्ष मनोज घोडके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भुजबळ म्हणाले, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी मी आग्रही भूमिका घेतली. सरकारने दखल घेऊन अध्यादेश काढला. मात्र, काहीही झाले तरी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू नये, यासाठी भाजप कामाला लागला आहे. भुजबळ यांनी याचिककर्त्याचे सोशल मीडियावर प्रोफाइल देखील उपस्थितांना दाखवले.
महत्त्वाच्या बातम्या
- लसीकरण सरकारचीच जबाबदारी, मोदींनी त्याची जाहिरातबाजी थांबवावी-पृथ्वीराज चव्हाण
- ‘…जणूकाही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आलेत’, संजय राऊतांचे भाजपावर टीकास्त्र
- पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- आर्यन खान प्रकरणाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल; किरण गोसावीच्या फोनवरुन कुणाशी बोलतोय आर्यन?
- पंचनाम्याची अट रद्द करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या; आ.नमिता मुंदडांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

