🕒 1 min read
नागपूर : देशभरात इंधन दरवाढीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असतांना बाबा रामदेव यांनी यासंदर्भात आपली भूमिका मंडळी आहे. मी त्यावेळी म्हटलं होतं की काळा पैसा परत आला तर इंधनाचे दर कमी होतील. पण सरकारला आता अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आणि राष्ट्रहिताचे काम करावे लागत आहे, त्यामुळे कधी तरी स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
यावेळी बोलत असतांना बाबा रामदेव म्हणाले की,’काळा पैसा परत आल्यावर पेट्रोलचे दर ३० रुपये होईल असं तुम्ही म्हणाला होता, पण आता दर वाढत आहे त्यामुळे देशात काळापैसा वाढलाय का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता बाबा रामदेव म्हणाले की, मी ज्यावेळी काळापैशांविरोधात देशभरात आंदोलन केलं होतं. त्यावेळी मी काही पर्याय ठेवले होते. कर चुकवणारे असतील किंवा काळापैसा साठवला असेल तर त्यावेळी मी म्हणालो होतो की, जो क्रुड इंधनाचा दर आहे, त्यानुसार जर इंधन विकले आणि कर कमी केला तर ३० रुपयांमध्ये पेट्रोल विकणे शक्य होते. पण आता सरकारपुढे अनेक आर्थिक संकटं आहे, देशहिताचे कार्य सुरू ठेवायचे आहे. सामाजिक कार्य सुरू ठेवायचे आहे. सरकार सुद्धा चालवायचे आहे, त्यामुळे कधी ना कधी तरी स्वप्न हे पूर्ण होईल,’ असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘भारत आणि पाकिस्तान सामना उद्या होणार आहे. या परिस्थिती भारत पाकिस्तान असा सामना होणे हे देश हितासाठी योग्य नाही. क्रिकेटचा खेळ आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही’, असेही यावेळी बोलतांना बाबा रामदेव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’


