Share

लसीकरण सरकारचीच जबाबदारी, मोदींनी त्याची जाहिरातबाजी थांबवावी-पृथ्वीराज चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : देशात कोरोना लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार करण्यात आलाय. तशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईत भारताचे हे मोठे यश असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच मोदी सरकारकडून याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राच्या या धोरणावर आक्षेप घेत टीका केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकांना कोरोना लस विकत घ्यायला भाग पाडले. कोरोना लसींची किंमत वाढवली ही मोदी सरकारची अक्ष्यम चूक आहे. केंद्र सरकारने लस विकत घेऊन ती राज्यांना विकत दिली असती तरी चालले असते. लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आहे. मोदी सरकराने ही जाहिरातबाजी थांबवावी अशी टीका चव्हाण यांनी कोल्हापुरात केली.

‘जगातील प्रत्येक देशाने कोरोना लस मोफत दिली. परंतु कुठेही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांचा फोटो छापला नाही. मोफत लसीकरण ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. लसीकरणाची ही जाहिरातबाजी मोदींनी थांबवावी. अनेकांनी यावरून मोदींचा फोटो काढवा अशी मागणी केली आहे. लसीकरण हा इवेंट नाही ती एक प्रक्रिया आहे. फोटो छापायचे आदेश कुणी दिली याची चौकशी व्हावी. येथून पुढे तिसऱ्या टप्प्यातील व्हॅक्सिन करणार का? हेही मोदी सरकारने जाहीर करावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!