Share

भारताची कसोटीवर पकड ! दुसऱ्या दिवसाखेर एक बळी गमावून देखील भक्कम स्थिती कायम

Published On: 

चेन्नई : चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात कालपासून दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या. या धावसंख्येपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली आहे. परंतु दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी तळातील भारतीय फलंदाजांच्या पटापट विकेट काढल्या. त्यामुळे ९५.५ षटकात ३२९ धावांवर भारताचा पहिला डाव संपुष्टात आला.

यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. मात्र, दुसरा दिवस हा भारतीय संघाच्या पारड्यात पडला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या १३४ धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाची स्थिती भक्कम झाली आहे. फिरकीपटू आर. अश्विनने चार विकेट्स मिळवल्या. तर, अक्सर पटेलने ३ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पहिला बळी घेतला. यासोबतच इशांत शर्माने देखील २ बळी मिळवत महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं.

विकेटकिपर बेन फॉक्स (१०७ चेंडूत ४२ धावा)वगळता इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान, भारतीय संघाकडे २४९ धावांची आघाडी आहे. तर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ५४ धावांवर एक बळी गमवावा लागला आहे. शुभमन गिल २८ चेंडूत १४ धावा काढत पायचित(lbw) झाला. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा ही जोडी उद्या मैदानात पुन्हा उतरेल. शर्मा ६२ चेंडूत २५ धावा तर चेतेश्वर पुजारा १८ चेंडूत ७ धांवांवर बिनबाद राहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!