जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काल राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त मुक्ताईनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुढील विधानसभेत रोहिणी खडसे यांना विजयी करण्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकद लावणार’, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिलीय. त्यामुळे जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे पुढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवारच जाहीर केलाय काय ? या चर्चेला उधान आले आहे.
‘रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. १५ टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल’, असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुलवामाच्या स्मृतीत आर्मीने शेअर केला व्हिडिओ, पाहून तुमच्याही डोळ्यात तरळतील अश्रू
- पुलवामा स्मृतिदिनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जम्मूतून 7 किलो स्फोटके जप्त
- टूलकिटप्रकरणी अटकेनंतर काय म्हणाली दिशा रवी?, कोर्टाने सुनावली 5 दिवसांची कोठडी
- #ValentineDay : आ. रोहित पवारांनी बळीराजाची भेट घेऊन केलं प्रेम व्यक्त
- पंतप्रधान मोदींनी हेलिकॉप्टरमधून टिपले चेन्नई टेस्टचे दृश्य, शेअर केला फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

