🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : मागील ४-५ दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात पाऊस कमी जास्त प्रमाणात सुरु आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खूप गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन नागरिकांनी करावं, असं देखील सांगण्यात आलं आहे. येत्या २४ तासांसाठी हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा भागात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच येते ३ दिवस राज्यात पावसाची स्थिती अशीच राहणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेरपडू नये. तसेच नदी, नाले आणि धरण क्षेत्र भागात नागरिकांनी पर्यटनासाठी जाऊ नये. पूरस्थिती निर्माण होण्याची भेटी असल्याने नागरिकांनी त्यासंबंधीची सर्व काळजी घ्यावी.
महत्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar । “मंत्रिमंडळ विस्ताराचं अद्याप निमंत्रण नाही, पण…”; अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
- Eknath Shinde | मी एकटा मुख्यमंत्री नाही, माझ्याबरोबर असलेले ५० लोक मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
- BJP State President । आशिष शेलार होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?, सूत्रांची माहिती
- Udayanraje Bhosale | मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण… – उदयनराजे भोसले
- Weight Loss Drinks | वजन कमी करायचं आहे, पण होत नाही? मग ‘ही’ पेय नक्की ट्राय करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

