🕒 1 min read
नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली. तसेच आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललो आहोत त्यामुळे लोक आम्हाला साथ देत आहेत, असे ते यावेळी म्हणाले. आजच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात भाजपचे मंत्री जास्त असणार आहेत. तसेच मुख्य खाती देखील भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या आमदारांमध्ये मंत्री पदांवरून रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता शिंदे यांनी एक अजब विधान केलं आहे.
“मी एकटा मुख्यमंत्री नाही तर माझ्याबरोबर असलेले ५० लोक मुख्यमंत्री आहेत, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. कारण आता त्यांना पूर्ण हक्क आहे कि, ते स्वतः कोणालाही काम सांगू शकतात आणि मतदारसंघातील कामं करवून घेऊ शकतात.”, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या:
- BJP State President । आशिष शेलार होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?, सूत्रांची माहिती
- Udayanraje Bhosale | मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण… – उदयनराजे भोसले
- Weight Loss Drinks | वजन कमी करायचं आहे, पण होत नाही? मग ‘ही’ पेय नक्की ट्राय करा
- Eknath shinde and Devendra Fadanvis | मंत्रिपदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रस्सीखेच! बंड थंड होईल का?
- Maharashtra Cabinet Expansion । गृह आणि अर्थ खाती फडणवीसांकडेच?, शिंदे सरकारमध्ये वर्चस्व भाजपचंच राहणार…


