🕒 1 min read
मुंबई: भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध टी २० मालिका ३-० ने जिंकली आहे. याआधी भारताने एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केले होते. भारतीय संघ मालिका जिंकल्यानंतर सहा वर्षांत प्रथमच ICC T20I संघ क्रमवारीत क्रमांक वर्ल्ड नं १ बनली आहे. भारताने माजी टी २० वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला मागे टाकून २६९ रेटिंग गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली १२ फेब्रुवारी २०१६ ते ३ मे २०१६ या कालावधीत भारत टी २० फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. भारतीय संघाचा शेवटचा पराभव २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या गट टप्प्यात न्यूझीलँडविरुद्ध झाला होता आणि स्पर्धेतील त्यांनी अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड विरुद्ध उर्वरित तीन सामने जिंकले होते.
????????????????. ????????????????????????????. ???????????????????????????? ☺️ ☺️
What a performance this has been by the @ImRo45 -led #TeamIndia to complete the T20I series sweep! ???? ????#INDvWI | @Paytm pic.twitter.com/L04JzVL5Sm
— BCCI (@BCCI) February 20, 2022
विराट कोहलीने टी २० चे कर्णधारपद सोडल्यानंतर आता नव कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया क्रमवारीत अव्वल ठरली आहे. रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर भारताने एकही मालिका गमावली नाहीये. वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यावरही विंडीजला एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वाची सुरुवात अव्वल झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नारायण राणेंना केंद्राचा जोर का झटका! सिंधुदुर्गातील चिवला बीचवरील ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश
- IND vs WI: अर्धशतक झाल्यानंतर सूर्याचे सेलिब्रेशन व्हायरल!
- रुपाली चाकणकरांनी संजय राऊतांना फटकारले, म्हणाल्या, “ठराविक पातळी सोडून…”
- “साहाने वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक करायला नको होत्या” सौरव गांगुलीच्या भावाचे वक्तव्य
- ‘…तर आम्ही थेट काँग्रेस कार्यालयावर जाऊन धडक देऊ’ – आमदार मिहिर कोटेचा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
