मुंबई: श्रीलंका दौऱ्यावर निवड न झाल्याने नवा वाद सुरु झाला आहे. रिद्धिमान साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर वचन न पाळल्याचा खुलासा केला होता. यानंतर आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) चे सचिव आणि सौरव गांगुलीचे मोठे बंधू स्नेहशिष गांगुली म्हणाले की रिद्धिमान साहाने त्याच्या आणि निवडकर्त्यां/बीसीसीआयमधील खाजगी संभाषणावर सार्वजनिकपणे टिप्पणी करून चूक केली आहे.
सौरव गांगुली आणि त्याच्यामधील झालेल्या संभाषणाबाबत साहाने सांगितले होते. यावर स्नेहशीष म्हणाले “हे माझे वैयक्तिक मत आहे, परंतु मुख्य निवडकर्ता/बीसीसीआयने साहाला जे सांगितले ते खाजगी होते.त्याने या गोष्टी सार्वजनिक करायला नको होत्या. तसेच, तो रणजी करंडकही खेळू शकला असता. त्यांनी माघार घेण्यामागे वैयक्तिक कारणे सांगितली आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. त्याच्यासाठी दार सदैव उघडे असते, जेव्हा त्याला संघात सामील व्हायचे असेल तो येऊ शकतो”
सौरव गांगुलीने रिद्धिमान साहाला न्यूझीलँडमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अभिनंदनपार मेसेज केला होता. ज्यात त्यांनी साहाला ते बीसीसीआय असे पर्यंत संघात स्थान देईल असे सांगितले होते. मात्र आता अवघ्या काही महिन्यात साहाला संघातून बाहेर काढले गेले आहे. या सगळं खुलासा साहाने श्रीलंका दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर आम्ही थेट काँग्रेस कार्यालयावर जाऊन धडक देऊ’ – आमदार मिहिर कोटेचा
- “त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही”, चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- “बीसीसीआयने याबाबत कारवाई करावी’ ; रवी शास्त्रींचा साहाला पाठींबा
- उदयनराजेंचा स्वॅग! बैलगाडा शर्यतीत जोरदार एन्ट्रीने केले सर्वांनाच घायाळ
- ‘वक्तव्याचा विपर्यास करणारे म्हणजे नाक खाजे अन् नक्टी खिजे’ – गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

