मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजला ८ धावांनी पराभूत केले आहे. तसेच तीन सामन्यांच्या या टी २० मालिकेत भारतीय संघाने २-० ने मालिका सुद्धा जिंकली आहे . भारतीय क्रिकेट संघासाठी हा इतिहासातील १००वा टी २० विजय ठरला आहे.
वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने विंडीजला १८६ धावांचे लक्ष्य दिले. ज्यात भारताकडून सलामीवीर ईशान आणि रोहित कमी धावसंख्येयवर पॅव्हेलियन मध्ये परतल्यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी शानदार अर्धशतकी पारी खेळली. तर गोलंदाजीत विंडीजच्या रोस्टन चेसने ३ विकेट्स पटकावल्या.
भारताच्या १८६ धावांचे पाठलाग करताना विंडीजचा संघ ७ विकेट शिल्लक असतानाही २० ओव्हरमध्ये धावा पूर्ण करू शकले नाहीत. आणि भारतीय संघाने केवळ ८ धावांनी सामना आणि मालिका विजय निश्चित केला. रोहित शर्माच्या कर्णधारपदात हि दुसरी मालिका भारतने जिंकली आहे. या सामन्यात फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीच्या बॅटलाही सूर गवसला आहे. त्यामुळे चाहते अधिक आनंदी आहेत. तिसरा आणि शेवटचा टी २० सामना रविवारी (२० फेब्रुवारी) रंगणार आहे. ज्यात भारतीय संघ पुन्हा विंडीजला क्लीन स्वीप करायचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या
- पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या विरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल
- हिजाब प्रकरणावरुन कर्नाटक सरकारचे कर्नाटक उच्च न्यालयालयात महत्वाचे मत
- विराट कोहली, ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यरची धुवदार फलंदाजी ; भारताचे वेस्टइंडीज समोर १८७ धावांचे लक्ष
- महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व आता ”या” संयमी आणि शांत माणसाकडे
- मैदानात हरायच आणि शेमड्या मुलासारखं… ; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

