पटना: देशात सध्या ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यात विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. या सर्व विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. त्यामुळे प्रचार जोरदार चालू आहे.
आज पंजाब राज्यामध्ये निवडणुकीचा प्रचार थंडावला. रविवार दिनांक २० मार्च रोजी पंजाब राज्यात विधानसभेसाठी निवडूक होणार आहेत. पंजाबमधील ११७ जागांसाठी मतदान दिनांक २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंजाब निवडणुकीसाठी प्रचार करत असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी युपी आणि बिहारमधील जनतेच्या बाबतीत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. युपी बिहारी जनतेला आपण पुन्हा सत्तेवर आल्यास पंजाब राज्यातून कायमचे हाकलून लावू असे वादग्रस्त विधान पंजाब राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केले होते. यावरूनच बिहारमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला असून चन्नी यांच्या अटकेची मागणी पण बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे नेते मनीष कुमार सिंह यांनी केली आहे.
मनीष कुमार सिंह हे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.चरणजीत सिंग चन्नी हे एक देशातील अत्यंत महत्वाच्या पदावर असून त्यांनी केले हे वादग्रस्त वक्तव्य प्रचंड चुकीचे असून त्यामुळे देशाच्या एकात्मतेला तडा बसत असल्याचेही मनीष कुमार सिंह यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- हिजाब प्रकरणावरुन कर्नाटक सरकारचे कर्नाटक उच्च न्यालयालयात महत्वाचे मत
- विराट कोहली, ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यरची धुवदार फलंदाजी ; भारताचे वेस्टइंडीज समोर १८७ धावांचे लक्ष
- पुरवठा विभागाच्या आदेशाला डावलून पुन्हा सुरू झाले अवैध बायोडिझेल पंप
- …जेव्हा रेल्वेमंत्र्यांनी केला लोकलने प्रवास
- मैदानात हरायच आणि शेमड्या मुलासारखं… ; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

