🕒 1 min read
मुंबई: वेस्ट इंडिजला एकदिवसीय आणि टी २० मालिकेत पराभूत करून भारतीय विजयी मनस्थितीत श्रीलंका विरुद्ध खेळण्यास उतरणार आहे. तीन सामन्यांच्या या टी २० मालिकेत श्रीलंका आणि भारतीय संघ लढण्यास आजपासून मैदानावर उतरणार आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे तर श्रीलंका दासून शनाकाच्या कर्णधारपदात खेळेल.
श्रीलंका दौरा सुरु होण्याआधीच भारतीय संघातील अनेक नाव संघातून बाहेर पडले आहे. वर्क लोड मॅनेजमेंट ठेवण्यासाठी बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटच्या टी २० पासून श्रीलंकेविरुद्ध टी २० मालिकेतही ऋषभ पंत आणि विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. हे दोघेही कसोटी मालिकेसाठी संघाशी जोडले जातील. तर वेस्ट इंडिज विरुद्ध शानदार कामगिरी करणार सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर हे दोघे सुद्धा दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे यंदा नवीन खेळाडूंना संधी मिळणार आहे. तसेच दुखापतीतून बाहेर येत रवींद्र जडेजा संघात पुनरागमन करणार आहे.
With Mission 2022 set as the ????, every win counts!
Will #TeamIndia keep their ???? run going by winning the Paytm T20I Trophy #INDvSL?#BelieveInBlue | 1st T20I | Feb 24, Broadcast starts: 6 PM, Match starts: 7 PM | Star Sports 1/1HD/1 Hindi/1HD Hindi/Disney+Hotstar pic.twitter.com/JlAnpFf8HD
— Star Sports (@StarSportsIndia) February 21, 2022
श्रीलंका भारताच्या या दौऱ्यावर ३ सामन्यांची टी २० मालिका आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला टी २० सामना आज (२४ फेब्रुवारी) ला लखनऊ येथे खेळवला जाणार आहे. तर पुढचे दोन सामने २६ आणि २८ तारखेला खेळवले जातील.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी!
- ‘विरोधकांना मलिकांच्या राजीनाम्याचा आसुरी आनंद घेऊ देणार नाही’ – छगन भुजबळ
- “…तोपर्यंत नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही”; ‘वर्षा’वरील बैठकीनंतर भुजबळांची माहिती
- नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांनी जल्लोषात नाचवली तलवार; अटक होण्याची शक्यत
- ‘विरोधक सत्तेचा दुरुपयोग करतात’- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
