मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंका विरुद्ध टी २० मालिका जिंकत नवीन इतिहास रचला आहे. ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत भारताने लंकेला ३-० ने क्लीन स्वीप केले आहे. या विजयासह टीम इंडियाने सर्वाधिक सलग T20I विजयांच्या यादीत अफगाणिस्तान आणि रोमानियाशी बरोबरी केली. भारताने १२ सामन्यांपैकी बॅक-टू-बॅक १२ विजय मिळवले आहेत.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ नवीन शिखर गाठत आहेत. भारतीय संघासाठी हा या वर्षातील सलग तिसरा मालिका विजय असणार आहे. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिजला एकदिवसीय आणि टी २० सामन्यात परास्त केले होते. रोहितच्या टीम इंडियाने खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने न्यूझीलँडला मागे सोडत टी २० फॉरमॅटमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळवण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. तसेच घरच्या मैदानावर भारतीयांसाठी हा ४०वा विजय ठरला.
शेवटच्या टी २० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ६ विकेट्सने पराभूत केले आहे. भारतासाठी श्रेयस अय्यरने पुन्हा विजयी खेळी केली आहे.श्रीलंकेच्या १४६ धावांचा पाठलाग करताना अय्यरने भारतासाठी ७३ धावांची खेळ करून विजय मिळवून दिला. तसेच गोलंदाजीत भारताकडून आवेश खानने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. टी २० मालिकेतही विजय घोडदौड सुरु ठेवलेल्या भारतीय संघाचे पुढचे लक्ष्य कसोटी मालिकेकडे असेल.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय जनता पक्षातील नेत्याचा शिवसेनेला इशारा
- Russia-ukraine War:आक्रमक रशिया विरोधात एलोन मस्कची युक्रेनला महत्वाची मदत
- Russia-ukraine War: अमेरिकेतील ९/११ हल्ल्याचा फोटो शेअर करत युक्रेनने व्यक्त केला संताप
- BJP VS TMC : बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट
- “…तर युक्रेनहून बरेच विद्यार्थी वेळेवर परतले असते”, भूपेश बघेल यांची केंद्र सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

