नवी दिल्ली: युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एअर इंडियाचे दुसरे निर्वासन उड्डाण रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळावर निर्वासितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तर दुसरीकडे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
“खार्किव आणि कीवमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी भारत सरकारला विनंती करतो की या विद्यार्थ्यांना सीमेजवळ आणावे जेणेकरून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. तसेच, इव्हॅक्युएशन प्लेनची संख्या वाढवायला हवी”, अशी मागणी भूपेश बघेल यांनी केली आहे.
तसेच एअर इंडियाने तिकिटांचे भाडे 24,000-25,000 वरून 60,000-80,000 रुपये केले आहे, तेच असते तर आणखी बरेच विद्यार्थी वेळेवर परत आले असते असा आरोपही बघेल यांनी केला आहे. दरम्यान एअर इंडियाची तिसरी फ्लाइट AI1940 जे हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून निघाले होते, ते देखील रविवारी (२७ फेब्रुवारी)दिल्लीला पोहोचले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याबाबत ट्वीटरवर माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…तशी वेळ आल्यास महाराष्ट्र गप्प बसणार नाही”, सुभाष देसाईंचा इशारा
Russia -Ukraine War: युक्रेनमधून भारतात येण्यास तरुणीने दिला नकार; कारण कौतुकास्पद
युक्रेनच्या सैनिकाने स्वतःला बॉम्बने उडवत रशियन योजनांवर फेरले पाणी
आमचे फोन टॅप करण्यात तत्कालीन गृहमंत्र्यांचा हात; फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करावी- नाना पटोले
PAK vs AUS: तब्बल २४ वर्षांनी कांगारू पाकिस्तान दौऱ्यावर ; हजारो पोलीस सुरक्षेसाठी तैनात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

