🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगलोर येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका संघ फलंदाजीसाठी उतरला परंतु संघाची सुरुवात चंगली झाली नाही. आणि पहिल्या दिवस अखेर ६ बाद ८६ अशा अवघड स्थितित संघ होता.
परंतु दुसऱ्या दिवशी ही संघाला चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे सर्व संघ अवघ्या १०९ धावांवर ऑलआउट झाला. श्रीलंकेकडून अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथूज याने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.
गोलंदाजी करताना भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. व अक्षर पटेलने १ विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
