Share

IND vs SL: ‘तो दुर्दैवी ठरतोय’ विराटच्या ढासळत्या फॉर्मवर ; माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विराट कोहली गेल्या काही काळापासून सर्वच फॉरमॅटमध्ये खराब कामगिरीचा शिकार होत आहे. विराटने आंतरराष्ट्रीय शतक झळकावून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, त्याचा शेवटचा शतक २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध डे नाईट कसोटी दरम्यान आला होता. ७३ डावात एकही शतक न आल्याने आता त्याची सरासरी ५० च्या खाली गेली आहे. विराटची कामगिरी बघता क्रिकेट रसिकांसह माजी खेळाडू देखील चिंतीत आहे.

विराटच्या (virat kohli) ढासळत्या कामगिरीवर बोलताना वासिम जाफर (wasim jaffer) म्हणाले “विराट तो खेळाडू नाहीये, तो दुर्दैवी राहिला आहे . जेव्हा तुमची त्याच्यासारखी कारकीर्द असेल, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या स्थितींना सामोरे जावे लागते. आपण नेहमीप्रमाणेच त्याचे ७१ वे शतक लवकर येईल अशी आशा करत होतो. ही पुन्हा ७१ व्या शतक जरी नसले तरी त्याला किमान ५०-६० धावा काढताना बघायला आवडेल.”

दुसऱ्या कसोटीच्या सुरुवातीला कोहलीची सरासरी ५० च्या वर होती. पण या मालिकेतील तीन डावात त्याने अनुक्रमे ४५, २३,१३ धावा केल्या आहेत. २०१७ नंतर प्रथमच विराटची कसोटीत सरासरी ५० च्या खाली गेली आहे. कसोटी क्रिकेटमधील सरासरी ४९.९६ वर घसरली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!