औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली सिटीबस सेवा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ८ जून पासून पुन्हा एकदा सुरू केली आहे. आता प्रवाशांची मागणी वाढत असल्याने सोमवारपासून आणखी सहा सिटी बस वाढवण्याचा निर्णय स्मार्ट सिटी प्रशासनाने घेतला आहे. या सिटी बस चिकलठाणा ते रांजणगाव असा प्रवास करतील. एकूण २२ बसेस औरंगाबादकरांच्या सेवेत धावतील.
कोरानाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फेब्रुवारीपासून सिटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता सध्या स्थितीत औरंगाबाद शहरातील रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने 7 जून पासून शहरातील सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली त्यानुसार जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद शहरात अनलॉक केले आहे. त्यामुळे ८ जून पासून पाच मार्गांवर १६ सिटी बस सुरू करण्यात आल्या आहेत.
सध्या सिटी बस दिवसभरात २४१ फेऱ्या करीत आहेत. मात्र आता नागरिकांकडून आणखी बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत असल्याने १४ जून पासून प्रशासनाने आणखी सहा सिटी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिटी बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक राम पावणीकर, उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोडे यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यातील पाच मार्गांवरील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता बसेस मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्ग क्रमांक १९ चिकलठाणा ते रांजणगाव मार्गे सिडको बस स्टँड या मार्गावर सोमवारपासून आणखी सहा बस सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता एकूण बावीस बसेस प्रवाशांच्या सेवेत उतरतील. २२ बसद्वारे ३१३ फेऱ्या पूर्ण केल्या जातील. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी बसेसचे निर्जंतुकीकरण केले जाते. तसेच प्रवाशांनाही मास्क घातल्यानंतरच बसमध्ये चढू दिले जात आहे. नियमांचे पालन करीत प्रवास आणि सिटी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पावनीकर यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे बंद पर्यटनस्थळे उघडण्यासाठी आमदार दानवे यांचे पर्यटनमंत्र्यांना पत्र
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन समाज एकवटला, औरंगाबाद मनपा निवडणूकीवर बहीष्काराचा इशारा
- नाना पटोलेंच मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान ! मुख्यमंत्र्यांचा काहीतरी मान ठेवा; भाजपची टीका
- कोरोनामुळे वैजापूरात कोट्यावधींची कर वसूली थांबली, विकास कामांना मोठा ब्रेक!
- आज राज्यात १०,४४२ नवे रुग्ण तर ‘इतक्या’ रुग्णांना डिस्चार्ज


