Share

कोरोनामुळे बंद पर्यटनस्थळे उघडण्यासाठी आमदार दानवे यांचे पर्यटनमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे इथल्या अनेकांचा रोजगार हा पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना काळात ही पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. ही पर्यटन स्थळे सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. या संबंधी आमदार दानवे यांनी पर्याटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रात अमदार अंबादास दानवे यांनी लिहिले की, ‘जिल्ह्यात अंजिठा, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा आदी पर्यटन स्थळे आहेत. इथे देश-विदेशातून पर्यटक येतात. कोरोनाची साथ आल्यापासून या शहराकडे देशी, परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे हॉटले चालक, वाहतूक करणारे, ट्रॅव्हल एजंट, ड्रायव्हर, पर्यटनस्थळी असलेले दुकानदार, कलाकार आदींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे सर्व पर्यटन केंद्रे तातडीने खुली करण्यात यावी.

कोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या संबधी या व्यवसायातील लोकांनीही पर्यटन स्थळे खुली करण्याची मागणी केली होती. त्यात आला राज्यात सर्वच ठिकाणी अनलॉक झाले आहे. त्यामुळे आता पर्यटन केंद्र देखील अनलॉक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!