Share

नाना पटोलेंच मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान ! मुख्यमंत्र्यांचा काहीतरी मान ठेवा; भाजपची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कधीही अपेक्षित नसणारी राजकीय आघाडी झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. दरम्यान, आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसची नाराजी अनेकवेळा समोर आली आहे.

आता एका कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ‘मतदार संघाच्या हक्कासाठी, तुमच्या मागण्यांसाठी मंत्री यशोमती ठाकूर या रणरागिणी झाल्याचं आपण पाहिलं आहे. वेळ आली तर त्या तुमच्यासाठी CM च्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत.’ असं विधान नाना पटोले यांनी अमरावतीमध्ये केलं आहे.

https://twitter.com/keshavupadhye/status/1404092619928399881?s=20

या विधानावरून आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांच्यासह यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  ‘अन्याय झाल्यास मुख्यमंत्र्यांच्याही अंगावर जाऊ, अन्याय झाल्यास मंत्री यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांना भिडतील, ⁦नाना पटोले यांचं⁩ वक्तव्य. यशोमती ठाकूर ⁩ यांनी केलेली मारहाण पटोलेच्या लक्षात आहे वाटत. काय भाषा? काहीतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान ठेवा,’ असं भाष्य केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!