🕒 1 min read
वैजापूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतींची महसूल वसुली दरवर्षी ८० ते ९० लाख रुपये जमा होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे केवळ ३५ लाखांची वसुली झाली आहे. या वर्षी केवळ गौण खनिज सोडले तर आठवडी बाजार, घरपट्टी पाणीपट्टी वसुलीतून मिळणारा कप हातावर मोजण्या एवढाच जमा झाला आहे. तिजोरीत ठणठणाट झाला असून कारभार चालवायचा कसा असा प्रश्न सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पडला आहे.
कोरोनाचा संसर्ग दोन वर्षांपासून मार्च महिन्यात वाढू लागल्याने त्याचा परिणाम कर वसुलीवर होत आहे. यावेळेस शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा मोठा प्रसार झालेला पाहायला मिळाला. कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींवर आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पोलिस, आरोग्य विभागाच्या बरोबरीने सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी कोरोना दक्षता समिती व ग्रामपंचायतीचे प्रशासन खांद्याला खांदा लावून काम करू लागले. मात्र याचा परिणाम वैजापूर तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतींच्या कारभारावर झाला.
मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाची समाप्ती. या महिन्यात ग्रामपंचायतीचा सरासरी ७५ ते ८० टक्के कर वसूल होतो. आर्थिक वर्ष संपत असल्याने कर वसुलीच्या प्रमाणावर सरकारकडून निधी मिळत असल्याने ग्रामपंचायत सक्तीने करवसुली करते. मात्र यंदा सलग दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीची सर्व यंत्रणा कर वसूली ऐवजी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये गुंतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर ठाकरे सरकारचा अन्याय: आ. प्रशांत बंब
- तिन वर्षानंतरही संत एकनाथ रंग मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण, साडे पाच कोटींसाठी मनपाचा पाठपुरावा
- पठ्ठ्याने यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब पण प्रयोग फसला, डिफ्युज करायला गाठले पोलीस स्टेशन
- पालक म्हणतात दहावी-बारावीचे परिक्षा शुल्क परत करा, मंडळ म्हणते खर्च जास्त देणे कठिण!
- घरी परतणाऱ्या पादचारी वयोवृद्ध हॉटेल कामगाराचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

