औरंगाबाद : नगरोत्थान योजनेमधून जायकवाडीतील पाणीपुरवठा केंद्र, फिल्टर प्लांट लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल. तसेच वॉटर ग्रीड योजनेत पैठण शहराचा विचार करावा. त्यासंबंधी आराखडा तयार करावा, अशा सूचना रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या वॉटरग्रीड योजनेमुळे पैठणमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.
या संदर्भात भूमरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. पैठणमधील प्रभाग क्रमांक दहा व अकरामधील नागरिकांची पाणी समस्या लवकरच दूर करणार असल्याचे रोहयोमंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैठणमधील पाणी प्रश्नांबाबतच्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग, विलास भुमरे, पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, नगराध्यक्ष सुरज लोळगे आदी उपस्थित होते.
पैठण शहरातील प्रभाग क्रमांक १० व प्रभाग क्रमांक ११ मधील पाण्याची समस्या लक्षात घेता याठिकाणी जलकुंभ असण्याबाबतचा विचार भूमरे यांनी मांडला. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या जलकुंभास तत्काळ मंजुरी देऊन काम सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर नवनाथ महाराज मंदिर जलकुंभाचे उद्घाटन भूमरे व जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे भूमरे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- दैव बलवत्तर : मोठ्या झुंबरासह पीओपी स्लॅब कोसळला अन् आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

