मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सर्व प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुखांपेक्षा गंभीर आरोप परमबीर सिंह यांच्यावर आहेत, मात्र न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला असल्याचेही राऊत म्हणाले.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘परमबीरांच्या कागदी आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. शंभर कोटी वसुलीच्या आरोपात ईडी, सीबीआय घुसले व देशमुखांना तुरुंगात जावे लागले, पण देशमुखांपेक्षा गंभीर आरोप परमबीर सिंग यांच्यावर आहेत, मात्र न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे.’
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर ईडी, सीबीआय, आयकर अशा मिळून दोनशेच्या वर धाडी घालण्यात आल्या. देशमुख यांची आठ वर्षांची नातही केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीतून सुटली नाही. एका बाजूला हा अमानुष प्रकार, तर दुसऱया बाजूला परमबीर सिंह यांना दिलाशांमागून दिलासे. हे पाहिल्यावर न्यायव्यवस्था आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर कसा विश्वास ठेवायचा?, असा सवालही राऊतांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- “दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून…”, संजय राऊतांची टीका
- शाहिद कपूरच्या पत्नीचं दुसरं लग्न? व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल
- “पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी…” – उद्धव ठाकरे संतापले
- PAK vs AUS : ऐतिहासिक मालिकाविजय..! तब्बल २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियानं रचला नवा इतिहास
- “रावणाचा जीव बेंबीत होता, तसा काहींचा जीव मुंबईत”; उद्धव ठाकरेंचा टोला


