Share

देश आर्थिक संकटात, २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्क्यांवर घसरला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : देशावर आर्थिक संकट आले आहे. जागतिक मंदीमुळे देशाचा आर्थिक विकास खुंटला आहे. तर आता देशाच्या आर्थिक विकासाबाबत अजून एक चिंताजनक बातमी आली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी घटला असून ५ टक्क्यांवर आला आहे. हा आता पर्यंतचा नीचांक आहे. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलत असून तीला उतरती कळा लागलं असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या सहा वर्षांतील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट हा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का मानला जात आहे. २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ रेट ५ टक्क्यांवर आला आहे. याआधी हा ग्रोथ रेट ५.८ टक्के होता. देशाची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचंच हे आकडे सांगत आहेत.

दरम्यान देशात सध्या आर्थिक मंदी आहे. या मंदीमुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. तर लाखो तरुण अजूनही रोजगाराच्या शोधात आहेत. अशी सगळी विदारक आर्थिक परिस्थिती आहे. तर ऑटोमोबाईल सेक्टर, लहानमोठे उद्योगधंदे धोक्यात आहेत. त्यामुळे मोदी सरकार नेमक करतय तरी काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू लागला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!