🕒 1 min read
मुंबई : आपल्याला माहित आहे की, राजकारण म्हटलं की, आरोप-प्रत्यारोपांची खेळी ही सुरूच असते. मोदी सरकारवरही अनेक नेत्यांकडून टीका केल्या जातात. अशातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारची समस्या सांगत त्यांच्यावर चांगलाच निशाणा धरला आहे.
वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते. परंतू विकासकामांबाबत सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच सरकारची मोठी समस्या आहे, असं म्हणत नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला चांगलंच फटकारलं आहे. आज मुंबईमध्ये नॅशनल कंव्हेशन ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स 2022 या कार्यक्रम होता. त्यावेळी ते बोलत होते.
भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागणार असल्याचंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
पुढे ते असंही म्हणाले की, आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करता येईल. कोणतेही प्रकल्पासाठी त्यांची गुणवत्ता, त्याची किंमत आणि त्याला लागणारा वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो.
महत्वाच्या बातम्या :
- उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास- उद्धव ठाकरे
- Eknath Shinde | मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिम्मत करणार नाही- एकनाथ शिंदे
- Uddhav Thackeray | आमच्याकडेही खोके येत आहेत मात्र आमच्या खोक्यांमध्ये निष्ठा आहे – उद्धव ठाकरे
- Vinayak raut | “महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येणाच्या मानसिकतेत”; विनायक राऊतांचा दावा
- Swine Flu| ठाणे मध्ये स्वाईन फ्लू आजाराचं थैमान, मृत्यू संख्येतही वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
