🕒 1 min read
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर तिखट शब्दात टीका केली आहे. ईडीच्या कारवाईबाबत देखील त्यांनी हिंदी चित्रपटातील डायलॉगबाजी करत अनिल परबांना टोला लगावला आहे.अनिल परबांना भीती वाटते म्हणून त्यांनी मुदत मागितली आहे.
राहुल गांधी एकदा गेले दोनदा गेले चौथ्यांदा देखील गेले पण सर्वांच्या मनात भीती आहे गेल्यानंतर काय होईल? तर त्यांनी अनिल देशमुख यांना विचारावं की कार्यालयात गेल्यावर काय होऊ शकते. या सोबतच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी सध्या धमक्यांचं राजकारण सुरू केलं आहे. जर राज्यसभे प्रमाणेच विधानपरिषदेत देखील असंच राजकारण सुरू ठेवलं तर आम्ही सोडणार नाही असा इशाराच किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या सोमवारी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. किरीट सोमय्या आता नेमका कुठला मोठा गौप्यस्फोट करतायेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
