Share

उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृत्युदर कायम

Published On: 

उस्मानाबाद: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट बघायला मिळत आहे मात्र मृत्यूदर कायम असल्याने अजूनही चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी दिवसभरात ४०० नवे रूग्ण आढळून आले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९७ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी मृत्यूदर कायम असल्याचे चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील ३८७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते तर १९६२ जणांची रॅपिड ॲन्टीनज टेस्ट करण्यात आली होती. यापैकी ४०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातील १०२, तुळजापूर ८०, उमरगा ३०, लोहारा ३५, कळंब २८, वाशी ५७, भूम २५ तर परंडा तालुक्यातील ४३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे दिवसभरात ११जणांचा मृत्यू झाला आहे. यात उस्मानाबाद, बसवंतवाडी, तुळजापूर, उमरेगाव, बामणी, थुक्रटवाडी येथील रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६० टक्के तर मृत्यूदर २.२८ टक्के आहे. आतापर्यंत २ लाख ६५ हजार २६७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ४९९०३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचे शेकडा प्रमाण ३८.६० टक्के आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत ५१५१ रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू असून ११३२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर एकूण ४९९०३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ४३६२० जणांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!