🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यात भारत आणि न्युझीलंड हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे आहेत. इंग्लंडमधील साउथहॅम्पटन येथे १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना होणार आहे. तसेच यावेळी भारतीय संघासोबत भारतीय महिला क्रिकेट संघही इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताचे महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघ हे एकाच विमानाने इंग्लंडला रवाना होतील.
यादरम्यान बीसीसीआयने पुरुष आणि महिला संघात प्रवासाच्या व्यवस्थेत आणि कोरोना चाचणीच्या व्यवस्थेत भेदभाव करत आहे अशी महिती समोर आली होती. यावर महिला संघाकडुन प्रतिक्रिया देण्यासाठी महिला टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पुढे आली आहे. हरमनप्रीतने ट्विट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कोरोना चाचणी वैयक्तिक पातळीवर करण्याचा निर्णय हा सर्वस्वी खेळाडूंनी स्वत: घेतला आहे. असे तिने म्हणले आहे. मीताली राजनेही असेच ट्विट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Traveling is a challenge in the pandemic but it is reassuring to see elaborate measures by BCCI for our health and safety. A charter ✈️ to Mumbai and UK and regular RT-PCR Tests at home. #LetsDoThis
— Mithali Raj (@M_Raj03) May 18, 2021
The BCCI has organised Charter flights to ferry both men and women players to Mumbai before we leave for the UK. Considering the distance and individual convenience players have made their own choice.
— Harmanpreet Kaur (@ImHarmanpreet) May 18, 2021
भारताचा पुरुष क्रिकेट संघ प्रथम न्युझीलंड सोबत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना आणि यानंतर इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. तर महिला क्रिकेट संघ हा इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघासोबत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. २ जून रोजी हे दोन्ही संघ एकाच चार्टर्ड विमानाने इंग्लंडला रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींसमोर गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, मात्र गडकरीच पंतप्रधान पाहिजेत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
- ‘ही वेळ मोर्चे काढण्याची नाही, आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो’
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
