Share

कोल्हापुरात आता सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

Published On: 

कोल्हापूर : दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा हाहाकार दिसून येत आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका वाढला आहे. आलेल्या पुरामुळे सांगली – कोल्हापूर बायपास महामार्गासह 9 मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवास कोणीही करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्यातच आता कोल्हापुरात आता सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोलचा पुरवठा केला जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापनच्या वाहनांनाच केवळ इंधनाचा पुरवठा होणार आहे. पूरस्थितीमुळे अशा प्रकारचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. पूरस्थिती गंभीर होत असताना, लोक अनावश्यक बाहेर फिरत असल्याने जिल्हा प्रशासने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्र व कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत चालली आहे.त्यामुळे आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीतील पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दुधगंगा या नद्यांच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. उदगाव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पहाटे चार वाजता पाण्याखाली गेला आहे. याबरोबरच तालुक्यातील इतर सांगली-कोल्हापूर बायपास मार्गासह जिल्हा आणि राज्य आठ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!