औरंगाबाद : शहरातील अनेक भागांमध्ये लिक झालेले ड्रेनेज त्यामुळे रस्त्यांवर वाहणारे ड्रेनेजचे पाट अशी परिस्थिती आहे. यामुळे अनेक ठिकाणी रोगराई पसरलेली आहे. मात्र मनपाचे आत्तापर्यंत याकडे दुर्लक्ष झाले होते. आता देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मनपा प्रशासनाने प्रत्येक झोन कार्यालयासाठी १ कोटी २० लाखांचे पॅकेज जाहीर केले आहे. नऊ झोनकरिता दहा कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ड्रेनेज आणि पाणीपुरवठा संबंधीची दुरुस्तीची कामे या निधीतून केली जाणार आहेत. त्यामुळे येणारा काळात शहरातील वॉर्डावॉर्डांमध्ये ड्रेनेज संबंधी कुठलीही समस्या दिसायला नको. मात्र मिळालेल्या निधीचा वापर कसा होतो यावर ते अवलंबून आहे.
महानगरपालिकेची कर वसुली मोठ्या प्रमाणावर थंडावली आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव हे कारण यासाठी दिले जात आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यामुळे मार्च महिन्यात होणारी सर्वाधिक वसुली होऊ शकली नाही. कोरोनाची पहिली लाट सुमारे चार ते पाच महिने होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्याचा परिणाम कर वसुलीवर झाला. फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यात देखील बहुतांश व्यवहार बंद होते. त्यामुळे कर वसुली होऊ शकली नाही.
कर वसुली न झाल्यामुळे मनपाचे मोठे उत्पन्न बुडाले. त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत आहे. रस्त्याची कामे वगळता अन्य कोणतीही विकासकामे करायची नाही असा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. केवळ देखभाल दुरुस्तीची कामे करण्याचे पालिकेने ठरवले आहे. पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाची देखभाल दुरुस्तीची कामे असतात ही कामे तात्काळ करावी लागतात.
त्यामुळे या कामांसाठी झोन कार्यालय निहाय पॅकेज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ६० लाख आणि ड्रेनेज विभागाचा देखभाल दुरुस्तीसाठी साठ लाख असे १ कोटी २० लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. महापालिकेची ९ झोन कार्यालय आहेत. ९ झोन कार्यालयांसाठी दहा कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी ४१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी!
- डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन
- ‘काँग्रेसने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले’, काँग्रेसचा हल्लाबोल
- कार्तिक आर्यनचा नवा चित्रपट ‘कॅप्टन इंडिया’, हंसल मेहता करणार दिग्दर्शन
- जलयुक्त शिवारच्या कामात चूक झाली असेल तर त्याची चौकशी करा – फडणवीस


