Share

८१२ गावात ‘या’ गोष्टींमुळे एकही कोरोना बाधित नाही

Published On: 

औरंगाबाद : जिल्हयातील ८१२ गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण नाहीत. ही दिलासा देणारी बाब आहे. त्रिसूत्रीचे पालन केल्याने त्या गावांमध्ये रुग्ण नसल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी सांगितले.
राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शहरातसह आता ग्रामीण भागातही रुग्ण संख्येत वाढ होते आहे. मृत्यूचे प्रमाण  देखील वाढले आहे. मध्यंतरी कमी झालेल्या रुग्णसंख्ये नंतर बेजबाबदारपणे निर्बंधांचे उल्लंघन लोकांनी केल्याने ही रुग्ण संख्या वाढली. मागील वर्षी कोरोनामुळे शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोना पसरला होता. परंतु यंदा शहरासह ग्रामीण भागातही सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून  येत आहे. लक्षण नसलेल्या रुग्णांचा वावरामुळे देखील प्रदुर्भावात वाढ झाली. यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी ग्रामदक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.
सध्या ६०४ गावांमध्ये कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर ८१२ गाव असे आहेत तिथे आठवडी बाजार नाहीत, कमी लोकसंख्या आहे. शिवाय गर्दी नाही, मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे यासारख्या गोष्टी पाळल्यामुळे त्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत. स्थानिक स्तरावर उपाय करत आहेत. याची पाहणी देखील केली जात असल्याचे डॉ. गोंदावले यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!