नवी दिल्ली : आजमितीला देशात दररोज अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे केंद्राने १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत केंद्राने लस कंपन्यांना आपल्या मासिक उत्पादनांपैकी ५० टक्के लसी राज्यांना व खुल्या बाजारात विक्री करण्याची परवानगी दिली आहे.
पण या निर्णयावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सुरू केले आहे. कोरोनाग्रस्त राहुल गांधी हे तर वारंवार सोशल मीडियाद्वारे मोदींवर निशाणा साधत आहेत. केंद्र सरकारचा लसीकरण निर्णय हा नोटाबंदीपेक्षा कमी नाही असा आरोप त्यांनी केलाय. सामान्य नागरिक लसीकरणासाठी रांगेत थांबतील. पैसे, आरोग्य आणि जीव धोक्यात घालतील आणि शेवटी या मोहिमेचा फायदा केवळ उद्योगपतींना होईल अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.
केंद्र सरकार की वैक्सीन रणनीति नोटबंदी से कम नहीं-
* आम जन लाइनों में लगेंगे
* धन, स्वास्थ्य व जान का नुक़सान झेलेंगे
* और अंत में सिर्फ़ कुछ उद्योगपतियों का फ़ायदा होगा।— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 21, 2021
तसेच राहुल केंद्राचे हे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण असल्याचा आरोप केला आहे. केंद्राच्या धोरणानुसार देशात १८ ते ४५ वर्षांपर्यंत नागरिकांना मोफत लस मिळणार नाही. मध्यस्थांना मूल्य नियंत्रणाशिवाय यात हस्तक्षेप करण्याची परवानगी देण्यात आली. यात समाजातील दुबळ्या घटकांना लस देण्याची कोणतीही हमी नाही. केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण आहे. त्यात वितरणाची कोणतीही रणनीती नाही, असे राहुल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण, राहुल गांधींची टीका
- नाशिकमध्ये रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमध्ये ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
- रोहितसाठी चेंडु बदलता येतो राहुलसाठी का नाही; इरफान पठानने उपस्थित केला प्रश्न


