नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे एकदिवशीय आणि टी २० चे कर्णधारपद सोपवले आहे. टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माकडे टी-20 संघाचे कर्णधारपद दिल्यानंतर आता त्याला वनडे संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो एकदिवसीय सामन्यात संघाचा कर्णधार असेल. कर्णधार झाल्यानंतर रोहितने बीसीसीआय (BCCI) टीव्हीला मुलाखत दिली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रोहितचा हा व्हिदिओ शेअर केला आहे.
1 मिनिट 24 सेकंदाच्या या मुलाखतीत रोहित शर्मा म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही भारतासाठी क्रिकेट खेळत असता तेव्हा तुमच्यावर खूप दबाव असतो. बरेच लोक सकारात्मक आणि नकारात्मक बोलतात. पण क्रिकेटपटू म्हणून माझे काम खेळावर लक्ष केंद्रित करणे आहे कारण लोक काय बोलतात यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा स्थितीत सामना जिंकता यावा म्हणून संपूर्ण संघ इकडे-तिकडे गोष्टी सोडून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करतो.
????️????️ "The pressure will always be there. As a cricketer, it is important to focus on my job."
SPECIAL – @ImRo45's first interview after being named #TeamIndia’s white-ball captain coming up on https://t.co/Z3MPyesSeZ. ????️
Stay tuned for this feature ⌛ pic.twitter.com/CPB0ITOBrv
— BCCI (@BCCI) December 12, 2021
लोक काय म्हणतील हे या संघाला चांगलेच माहीत आहे. जेव्हाही आम्ही हाय प्रोफाईल सामना खेळतो तेव्हा आमचे लक्ष आमच्या खेळावर असते. खेळादरम्यान आपण आपल्या हातात जे आहे ते करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही खेळाडूंसोबत घट्ट नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हे आम्हाला आमचे ध्येय साध्य करण्यात खूप मदत करते. राहुल भाई (मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड) देखील यात आम्हाला मदत करतात. असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- जितेंद्र आव्हाडांचा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; केली महत्वाची घोषणा
- ‘आव्हाडसाहेब, जमत नसेल तर मंत्रिपद सोडा, कुंपणच शेत खात असेल तर….’
- गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत गोपीनाथ गड पोहोचवण्याचा संकल्प! पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन


