मुंबई : राज्यात सद्या कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा घोळ कायम असतानाच आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार खुला प्रवर्गातील उमेदवारांना फक्त सहा वेळा तर ओबीसी (OBC) गटातून 9 वेळा आता परीक्षा देता येणार आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संधीची मर्यादा नसेल.
राज्य लोकसेवा आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध करून महत्वाची घोषणा केली आहे. लोकसेवा आयोगातर्फे विविध शासकीय पदांसाठी निवड प्रक्रियांमध्ये सुधारणात्मक उपाययोजनांपैकी स्पर्धा परिक्षांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न अथवा संधीची संख्या आता मर्यादित करण्यात आली आहे.
उमेदवारांनी पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ती संधी मानली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थित राहिल्यास ती संधी मानली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परिक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी मानली जाईल. यासोबतच, उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाणार आहे. हा निर्णय 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या परीक्षांबाबतच्या जाहिरातींना लागू होईल.

महत्वाच्या बातम्या
- EWS आरक्षणाच्या जीआरमध्ये चुका, मराठा समाजाला फायदा कसा होणार स्पष्ट करा – मेटे
- पुणेकरांनो, ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठीचे महत्वाचे ‘हे’ दहा नियम पाळाच; अन्यथा…
- जिथं ताकद, तिथं स्वबळ; राष्ट्रवादीने पहिल्यांदाच दिला स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा!
- आता उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांसाठी शिवसेना काँग्रेसला देणार मैत्रीची हाक?
- ईडीचे ऑफिस सद्या मोदींच्या घरातून चालतं; बच्चू कडूंचा भाजपवर ‘प्रहार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

