पंढरपूर : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
शासनाने लागू केलेले कडक निर्बंध नागरिक पाळत नसल्याने मुख्यमंत्र्याने ही भूमिका घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसध्याची परिस्थिती पाहता राज्याला १५ दिवस लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगितले आहे.
लॉकडाऊन केल्याने निश्तिच कोरोनाला लगाम लागेल पण यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांना देखील अनेक संकटाना सामोरे जावे लागते. हीच परिस्थिती लक्षात घेवून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी द्राक्ष शेती करणाऱ्यांची भूमिका सरकार समोर मांडली आहे.
पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी गटाने आज झरे येथील निवासस्थानी भेट घेतली. लॉकडाऊन पूर्वी द्राक्षेला सरासरी ५० रु. किलो जागेवर दर होता. परंतू लॉकडाऊन मध्ये १० ते १५ रु. किलो प्रमाणे द्राक्षे विकली गेल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातच pic.twitter.com/HBKzZWpKVO
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) March 28, 2021
‘लॉकडाऊन पूर्वी द्राक्षेला सरासरी ५० रु. किलो जागेवर दर होता. परंतु लॉकडाऊन मध्ये १० ते १५ रु. किलो प्रमाणे द्राक्षे विकली गेल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातच राज्य सरकारने लाईट बिलासाठी विद्युत पंपाची लाईट बंद करुन त्रास दिला आहे.
द्राक्ष बागेला दोन दिवस पाणी नाही दिले तर माल लूज पडतो त्यानंतर कोणताही व्यापारी ती द्राक्षे विकत घेत नाही. पुन्हा या वर्षी जर राज्य सरकारला लॉकडाऊन करायचे असेल तर अगोदर द्राक्ष शेतीचे कृषी विभागामार्फत पंचनामे करुन त्यांना हमीभाव द्यावा व लॉकडाऊन मुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.’ अशी मागणी पडळकर यांनी सरकारकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो; शाह-पवारांच्या भेटीबाबत आव्हाडांची प्रतिक्रिया
- लॉकडाऊनबाबत ‘या’ तारखेनंतर मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात; राजेश टोपेंचा इशारा
- भांडुप ड्रीम्स मॉल आगीतील नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित भरपाई द्यावी – आठवले
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

