पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडीतील सरकारमधील मंत्र्यांवर एकामागे एक आरोप होत आहेत. तर, सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं समोर येत आहे. तसेच, इतर काही मुद्द्यांवरून देखील वरिष्ठ नेते एकमेकांवर टीका करत असल्याचं दिसून येत आहे.
तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. असा टोला शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोक मधून लगावला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत संजय राऊत यांना फटकारलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या नेत्यांवर काय जबाबदारी टाकायची याचे सर्वस्व निर्णय हे शरद पवार घेत असतात. इतरांनी याबाबत टीका केली तर गोष्ट वेगळी मात्र तिन्ही पक्षातील मान्यवर नेत्यांनी एकमेकांवरच भाष्य करत अडचणीत आणण्याचं प्रयत्न करू नये. महाविकास आघाडीचं एकत्रित काम सुरु असताना कोणीही त्यात मिठाचा खडा टाकू नये,’ अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो…’
- उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवं सरकार यावं – प्रकाश आंबेडकर
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- #COVID19 शी लढा देण्याचा मंत्र ‘दवाई भी कडाई भी’ नक्की लक्षात ठेवा : पंतप्रधान मोदी
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

