Share

ग्रामीण भागात आरोग्यव्यवस्था सुदृढ असती तर सिदलीबाईचा जीव वाचला असता – वाघ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – दरड कोसळून घाट बंद झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. नंदुरबारमधल्या चांदसैली घाटातील ही घटना आहे. कालपासून घाटात दरड कोसळून रस्ता झाला बंद झाला आहे. सिदलीबाई पाडवी या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले जात होते. रस्ता बंद असल्याने सिदलीबाई पाडवी यांच्या पतीवर त्यांना खांद्यावर टाकून पायी चालत जाण्याची वेळ आली. या प्रवासादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आपल्या पत्नीला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी पतीने शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. अखेर सिदलीबाई यांनी वाटेतच प्राण सोडले. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून ग्रामीण भागात रस्ते आणि आरोग्य व्यवस्था कशी आहे हे देखील या निमित्ताने समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. नंदुरबार जिल्हा-चांदसैली दरड कोसळून २४ तासाहून अधिक वेळ झाला तरी ही रस्ता पुर्ववत न झाल्याने सिल्लीबाई पाडवी या महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने रस्ता बंद असल्याने ती जिल्हा रूग्णालयात पोहोचू शकली नाही व त्यात तिचा मृत्यू झालेला आहे. तिचा पती खांद्यावर ;सिदलीबाईला घेऊन अनवाणी फिरतोय. अत्यंत ह्रदयद्रावक व दुदैवी अशी ही घटना घडलीये

या घटनेनंतर राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचे वाभाडे निघालेले पहायला मिळताहेत ग्रामीण भागात आरोग्यव्यवस्था सुदृढ असती तर सिदलीबाईचा जीव वाचला असता हे नक्की. विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी मंत्री के.सी.पाडवी यांच्या मतदारसंघातील ही घटना आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!