🕒 1 min read
मुंबई: खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यातच आता त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी नांदेड येथे सभा घेतली होती. त्यावेळी न सांगताही तेथे ५० ते ६० हजार लोक जमा झाले होते. नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग बघा. असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
राज्य सरकारने पाठवलेलं पत्र अधिकाऱ्यांनी लिहून पाठवले आहे. फक्त पाठवायचं म्हणून हे लेखी उत्तर पाठवले. मुख्यमंत्र्यांनी देखील याची पुरेशी दखल घेतली नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
आवाज उठवायचा म्हटला, तर मी उठवू शकतो. आम्ही न बोलवताही जर नांदेडला ५० ते ७० हजार लोक हजर होतात, तर रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू. जर सरकार आमची दखल घेत नसेल तर आम्ही जे करायचं ते करू पण मग रायगडावर नांदेडसारखी गर्दी जमली तर याची जबाबदारी माझी नसणार, असा इशाराही त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
- शिखर धनव-आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट; आयशाची भावूक पोस्ट
- ‘तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे’
- ‘ते’ शिवसेनेचे नाही म्हणून ते मराठी नाही का संज्या? तुझ्यासारखा रड्या या जगात दुसरा सापडणार नाही
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
