गडचिरोली : भारत हा पुरुष प्रधान देश आहे. अंत्यसंस्कारावेळी पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकणारी एक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला मुलगा नाही म्हणून तिच्या ५ मुलींनी आपले अश्रू आवरत पार्थिवाला खांदा दिला. महिलेच्या अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग शेकडो गावकऱ्यांनी अनुभवला. मुलगा नसल्यामुळे पाच मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंतिम संस्कार केले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या पाच लेकींनी भासू दिली नसल्याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं आहे.
निर्मला पाकलवार यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पाकलवार यांना ५ मुली आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी पार्थिव स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला मुखाग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.
निर्मला यांचे पती अण्णाजी रामचंद्र पाकलवार हे माजी मुख्याध्यापक असून त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा पडगा आहे. मुलगा नसल्याची खंत त्यांना आयुष्यभर कधीही वाटली नाही. पत्नी गेल्यानंतरही आपल्या मुलींनी अंत्यसंस्कार करावे, या मताचे ते होते. त्यानुसार त्यांच्या ५ मुलींनी आपल्या लाडक्या आईला निरोप दिलाय.
- हिरो स्प्लेंडर बाईक आता पेट्रोलशिवाय धावणार; जाणून घ्या
- ‘हे’ लोक एक होऊन सुद्धा मोदी होऊ शकत नाहीत – किरीट सोमय्या
- एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचं फावतं; राऊतांचे भाजपवर टीकेचे बाण
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
