Share

समीर वानखेडे मुस्लीम नसते तर त्यांचा निकाहच लावता आला नसता – काझी मुज्जमिल अहमद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर काही जणांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणावरून सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, आता समीर वानखेडे मुस्लीमच आहेत असा दावा NCB चे समीर वानखेडे यांचा पहिला निकाह (लग्न) लावून देणाऱ्या काझीने केला आहे.

मलिक यांनी आज समीर वानखेडे यांचा डॉ. शबाना कुरेशीसोबतच्या विवाहाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. तसेच त्या लग्नाचा ‘निकाह नामा’ देखील त्यांनी प्रसिद्द केला आहे. त्यानंतर आता समीर वानखेडे यांचा पहिला निकाह (लग्न) लावून देणाऱ्या काझी मुज्जमिल अहमद यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

समीर वानखेडे खोटं बोलत आहेत. पहिल्या पत्नीशी लग्न करताना मी त्यांचा निकाह लावून दिला होता. त्यांच्या निकाहच्या वेळी २ हजार लोकं उपस्थित होते. तसेच संपूर्ण वानखेडे कुटुंबीय मुस्लीम आहेत अशी माहिती काझींनी दिली. जर ते मुस्लीम नसते तर त्यांचा निकाहच लावता आला नसता. त्यांच्या निकाहावेळी २ हजार जणांना दावत दिल्याचाही दावा काझींनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!